Thursday, January 16, 2014

एलेजी

कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून
कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी आधार सापडले नाहीत म्हणून
कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून
कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून
कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून
कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून
कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी वारसा खोटाय हे समजलं म्हणून
कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून
कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून
कधी आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून
मी विचार करतो की आपण सगळे
असे रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे
2013

No comments:

Post a Comment