समूहांचा रेटा मोठा प्रभावी असतो. वेगवेगळ्या माध्यमांतून समूह आपली मते लोकांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठरत जातात. सामान्यांमधून असामान्य नायक उभे करणे, ह्या नायकांचे उदात्तीकरण करून येणार्या पिढ्यांसमोर आदर्शांचा देखावा उभे करण्याच्या ह्या "कोव्हर्ट" मोहिमा सातत्याने सुरूच असतात. येणार्या पिढ्यादेखील बव्हंशी मागच्या पिढ्यांप्रमाणे गाफील आणि प्रवाहानुगामी असल्याने आपल्यासमोर येतील त्या देखाव्याना समाजाचे नायकत्व प्रदान करण्यात मागेपुढे बघत नाहीत. आपल्या पुढ्यात आलेल्या नायकांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करू पाहण्याची प्रवृत्ती पिढ्यांमध्ये क्वचितच दिसून . त्यातही वेगळा विचार करणार्यांचा प्रभाव ह्या रेट्यांपुढे अगदीच कमी पडतो. ह्या विरोधाची, विद्रोहाची धार यथावकाश कमी पडत जावून ती नष्ट होत जाते. प्रत्येकच गोष्टीप्रमाणे ह्या स्युडो नायकीकरणास अपवाद आहेत, पण ह्या ब्रॅंडींगच्या काळात ज्या झपाट्याने बुजगावणी उभी केली जात आहेत ते बघून असे अपवाद उरतील की नाही अशी शंका वाटते आहे
अनंत ढवळॆ
22/08/2015
अनंत ढवळॆ
22/08/2015
No comments:
Post a Comment